पाटना : रणजी चषक स्पर्धेची चैथी फेरी आजपासून सुरू झाली आहे. या फेरीत मिझोरम विरूध्द बिहार सामन्यास शुक्रवारपासून सुरूवात झाली. मिझोरमने पहिल्या डावात फंलदाजी करताना प्रतीक देसाईच्या शतकी तर टी. कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या दिवसअखेर २ बाद ३१० अशी मजल मारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा टी. कोहली ८८ तर पवन के.बी. १७ धावांवर खेळत होता.
Stumps Day 1: Mizoram – 310/2 in 82.6 overs (Pawan K B 17 off 56, Taruwar Kohli 88 off 213) #BIHvCAM @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 3, 2020
बिहारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मिझोरमने पहिली विकेट अवघ्या १८ धावसंख्येवर गमावली. त्यानंतर प्रतिक देसाई आणि टी. कोहली यांनी दुस-या विकेटसाठी २४८ धावा जोडल्या. प्रतिक देसाई १९२ धावांवर असताना अभिजीतने त्याला धावबाद केलं.
WICKET! Over: 64.4 Pratik Desai 192(210) Run Out Abhijeet, Mizoram 266/2 #BIHvCAM @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 3, 2020
त्यानंतर टी. कोहली आणि पवन के.बी. यांनी संघाचा डाव सावरत आणखी पडझड होऊ न देता संघाची धावसंख्या तीनशेपार नेली. मिझोरमकडून अभिजीतने १ गडी बाद केला.