नवी दिल्ली – भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी आता हाताचीही साथ सोडली आहे. यावेळी त्यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणाही केली आहे.
सावित्रीबाई फुले यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्या म्हणाल्या कि, काँग्रेसमध्ये माझा आवाज ऐकला जात नाही. म्हणून मी राजीनामा देत आहे. मी माझा स्वतःचा पक्ष लवकरच स्थापन करेल, असे त्यांनी सांगितले आहे. सावित्रीबाई फुले यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण, फुले यांच्यामुळे उत्तर प्रदेशात दलित मतांचा मोठा आधार होता.
Former BJP MP Savitri Bai Phule who joined Congress earlier this year, has resigned from the party, says ‘my voice is not being heard in Congress,hence I am resigning. I will form my own party’ pic.twitter.com/hJYiefyt1H
— ANI (@ANI) December 26, 2019
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या बहराईच लोकसभा मतदार संघातील माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी वर्षाच्या सुरुवातीला भाजपला रामराम ठोकला होता. लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाईंचा कॉंग्रेस प्रवेश भाजपासाठी मोठा धक्का मानला जात होता.