नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया आणि अलिगढ विद्यापीठात विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी इडिया गेटसमोर निदर्शने केली. सरकारने विद्यार्थी आणि घटनेवर हल्ला केला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांवर विद्यापीठाच्या आवारात घुसून हल्ला केला आहे. आम्ही घटनेच्या रक्षणासाठी लढू. आम्ही या सरकार विरोधात लढू असे त्या म्हणाल्या.
संध्याकाळी चार वाजता ही निदर्शने सुरू झाली. सुमारे दोन तास निदर्शने करण्यात आली, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.
प्रियांका गांधी यांनी रविवारी ट्विट केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेचा आवाज ऐकावा लागेल. त्यांचे सरकार तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा अरोप त्यात केला होता. शेम हा हॅशटॅग वापरत त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, देशातील विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली जात आहे. हे सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांचा आवाज ऐकालयला हवा, त्यावेळी भाजपा सरकार ईशान्य भारत, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत विद्यार्थी आणि माध्यमांचा आवाज दाबत आहे. हे सरकार भीत्रे आहे,अशी टीका त्यांनी केली.