राहुल गांधींची केंद्र सरकारवर जहरी टीका
नवीदिल्ली : दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी ट्विट करून मोदी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे. मोदी सरकार निर्मीत नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि एनआरसी कायदा हे दोन्ही कायदे भारतीयांमध्ये फूट पाडणारी अस्त्रे असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. त्याचबरोबर याचा विरोध करण्यासाठी अहिंसक मार्गाने सत्याग्रह करणे हाच चांगला मार्ग आहे, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.
The CAB & NRC are weapons of mass polarisation unleashed by fascists on India. The best defence against these dirty weapons is peaceful, non violent Satyagraha. I stand in solidarity with all those protesting peacefully against the CAB & NRC.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 16, 2019
पोलिसांनी रात्री जामिया विद्यापीठात केलेल्या लाठीमारावरून बराच गदारोळ सुरू असून, देशभरात याचे पडसाद उमटले आहेत. याच घटनेनंतर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि एनआरसी ही दोन्ही भारतीय समाजात फूट पाडणारी फॅसिस्टांची शस्त्रे आहेत. या घाणेरड्या अस्त्रांचा विरोध करण्यासाठी अहिंसक सत्याग्रह करणे हाच उत्तम मार्ग आहे. जे CAB आणि NRC विरोधात शांततेच्या मार्गानं विरोध करत आहेत. मी त्यांच्यासोबत आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या कायद्याविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. रास्ता रोको करत विद्यार्थ्यांनी भारत नगर येथे दिल्ली परिवहन मंडळाच्या तीन बस पेटवून दिल्या. या आगीनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त प्रचंड वाढवण्यात आला त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. जाळपोळीच्या घटनेशी संबंध नसल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांच म्हणणे आहे. बसेस जाळणारे बाहेरचे लोक होते, असे विद्यार्थी संघटनांनी म्हटले होते.