नवी दिल्ली – राज्यात भाजपचे सरकार असल्याने अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित करताना मला काँग्रेस नेत्याची मदत घ्यावी लागत होती, असे माजी लोकसभा अध्यक्षा आणि भाजप खासदार सुमित्रा महाजन यांनी सांगितले आहे. त्या एका कार्यक्रमात बोलत होत्या.
सुमित्रा महाजन म्हणाल्या कि, मध्यप्रदेशात काँग्रेसचे सरकार येण्यापूर्वी भाजपचे सरकार होते. आपल्याच पक्षाचे सरकार असल्याने मला अनेक गोष्टी बोलता येत नव्हत्या. अनेकवेळी इंदूरमधील जनहिताचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी काँग्रेस नेत्याची मदत घेत होते.
इंदूरच्या समस्या आणि प्रश्न उपस्थित करण्यासाठी मी काँग्रेस नेते जीतू पटवारी आणि तुलसी सिलावट यांना विनम्रपणे निवेदन द्यायचे. तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यामध्ये लक्ष घालतील, असे आश्वासन मी काँग्रेस नेत्यांना द्यायचे. इंदूरच्या विकासासाठी मी अशा प्रकारे काम केले, असे महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, सुमित्रा महाजन सलग आठ वेळा इंदूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालाय आहेत. यंदा मात्र त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.