अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही हिंदुंची असल्याचे सांगत ही जागा हिंदूंना देण्याचे आदेश तर अयोध्येतच पर्यायी ५ एकर जागा मुस्लिमांना मशिद बांधण्यासाठी देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत लवकरच राम मंदिर आणि बाबरी प्रकरणावर आधारित चित्रपटच्या निर्मितीसाठी पुढे सरसावल्याचं दिसून येत आहे. एका नामांकित वृत्तसंस्थेच्या माहिती नुसार पुढच्या वर्षी “अपराजिता अयोध्या” नावाच्या या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होईल.
तसेच, या चित्रपटातची कथा- पटकथा लेखनाची जबाबदारी के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी घेतली आहे. कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली आहे.
Very soon Kangana will have a grand launch of Aparajitha Ayodhya where they will announce the director and the cast #workinprogress #newbeginnings ??
— Rangoli Chandel (@Rangoli_A) November 25, 2019
गेली अनेक वर्षे सुरु असलेल्या रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं गेल्या काही दिवसांपूर्वी निकाल दिला होता. अशा महत्वपूर्ण निर्णयावर सुवानण्यात आलेल्या याच निर्णयाच्या आधारे आता कंगनाच्या निर्मितीअंतर्गत साकारला जाणारा चित्रपट सिनेरसिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे.
मात्र, अद्यापही “अपराजिता अयोध्या” चित्रपटाची अधिकृत घोषणा प्रतिक्षेत आहे.