निवृत्ती म्हणजे काय, आपल्यासाठी याचा नेमका अर्थ काय आहे आणि याची आपण तयारी कशी केली आहे. आनंदी, निरोगी व धनसंपन्न असणे म्हणजेच उत्तम निवृत्ती असे म्हणता येईल का? समाजात अनेक वयोगटातील लोकांशी चर्चा करताना आलेला मतप्रवाह पुढीलप्रमाणे आहे.
स्नेहा (वय 19) – निवृत्ती म्हणजे भरपूर पैसा साठवलेला असणे. ज्यातून मला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मी घेऊ शकते. फिरू शकते व माझे आवडते करिअर करू शकते.
रमेश (वय 25) – मी ज्यावेळी आर्थिकदृष्ट्या चिंतामुक्त होईल त्यादिवशी माझ्यासाठी निवृत्तीचा दिवस असेल. मी स्वतःचे आरोग्य व्यवस्थित सांभाळत आयुष्य जगेन. जेणेकरून मला माझी कमावलेल्या संपत्तीचा पुरेपूर उपभोग घेता येईल.
साधना (वय 35) – निवृत्ती म्हणजे मला आवडलेल्या वस्तूची किंमत न पाहता मला विकत घेता येईल म्हणजे माझी निवृत्ती झाली.
निलेश (वय 41) – निवृत्ती म्हणजे मी माझ्या आयुष्याचा शिल्पकार झालो पाहिजे. मनातील सर्व गोष्टी मला पूर्ण करता येतील तो माझा निवृत्तीचा दिवस.
विश्वनाथ (वय 58) – मला स्वतःला तंदुरुस्त राहायचे आहे. मला जग फिरायचे आहे. कोणत्याही प्रकारची पैशाची चिंता करायची नाही हे माझ्यासाठी निवृत्तीचे लक्षण आहे.
राधिका (वय 56) – भरपूर पैसे असल्याने देशातील सर्व तीर्थस्थानांना मनसोक्तपणे भेटी देता आल्या म्हणजे मी निवृत्त झाले.
वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येकाच्या निवृत्तीच्या व्याख्या व आराखडे वेगवेगळे असतात. परंतु या निवृत्तीचे नियोजन करत असताना प्रत्येक कमावती व्यक्ती नेमकी कशासाठी घाबरत असते हे जाणून घेणे आवश्यक आहे. निवृत्तीचे नियोजन निश्चितपणे यशस्वीरित्या पूर्ण करता येईल याचा आपण परामर्श घेऊ या.
संपूर्ण जगातील मतप्रवाह लक्षात घेतले असता 48 टक्के कमावत्या लोकांमध्ये आपला निवृत्तीचा काळ व त्यासाठी लागणारी रक्कम ही कशी जमवता येईल याचीच चिंता लागलेली असते. आपले निवृत्तीचे वय जसजसे जवळ येते तसतशी आपल्याकडे असणारी व कष्टाने साठवलेली संपत्ती संपून तर जाणार नाही ना आणि निवृत्तीनंतरचा काळ पुढील बाबींच्या खर्चांसाठी पैसे शिल्लक राहतील काय याची चिंता अनेकांना असते.
निवृत्तीनंतरच्या काळात अनेक बाबींवर मोठा खर्च होत असतो. पवयोपरत्वे सातत्याने येणारे शारिरिक व मानसिक आजार आणि त्यावर होणारा मोठा वैद्यकीच खर्च. पनिवृत्तीनंतर दैनंदिन गरजांसाठीदेखील पैशाची चणचण निर्माण होते.
पनिवृत्तीनंतर अनेक महत्त्वाच्या उद्दिष्टांसाठी व गरजांसाठी लागणारा पैसा शिल्लक नसल्याने बऱ्याच वेळा आपल्या गरजा बाजूला ठेवाव्या लागतात. पनिवृत्तीनंतर प्रत्येक छोट्या बाबींसाठीदेखील आपल्या अपत्यांवर विसंबून राहावे लागते. कारण पैशांची बचत व गुंतवणूक न केल्याने आर्थिक स्वातंत्र्य गमावण्याची पाळी येऊ शकते.
पनिवृत्तीनंतरही पुरेसा पैसा शिल्लक नसल्याने पुन्हा नोकरीच्या शोधात राहावे लागते व आपण खऱ्या अर्थाने निवृत्त होतच नाही. वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या आमूलाग्र बदलामुळे आयुर्मान वाढत गेले आहे. गेल्या 30 वर्षात जगभरात वयवर्षे 80 व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्यांची लोकसंख्या तिपटीने वाढली आहे. 2019 अखेरीला हा आकडा 143 दशलक्ष एवढा आहे. हाच आकडा 2050 पर्यंत 426 दशलक्ष पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2100 पर्यंत हाच आकडा 881 दशलक्ष पर्यंत पोचणार आहे.
यामुळेच प्रत्येक कमावत्या व्यक्तीसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. आज कमावत असताना मिळणारा पैसा सर्व खर्च जाऊन योग्यरित्या गुंतवला नाही तर भविष्यात ज्यावेळी निवृत्तीनंतरच्या वर्षांसाठी पुरेल एवढा पैसा आपण निर्माण केला आहे का. वयाच्या 18 ते 29 या तरुण वयात मुख्य खर्च शिक्षण व शिक्षणासाठीची बचत यासाठी होतो.
वयाच्या 30 ते 59 या टप्प्यात खर्च प्रामुख्याने स्वतःचे, मुलांचे संगोपन, मुलांचे शिक्षण, नंतर मुलांचे लग्न यावर होत असतो व निवृत्तीच्या वयात म्हणजेच साठ वर्षानंतर निवृत्तीनंतरच्या जगण्यावरील खर्च तसेच अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चांवर प्रामुख्याने पैशाचा वापर होत असतो.
प्रत्येक कमावती व्यक्ती निवृत्त होत असते. परंतु महागाई निवृत्त होत नसते. काळानुसार प्रत्येक वस्तू, सेवा व इतर सर्व बाबींचा खर्च वाढतच जाणार असतो. म्हणूनच पैशांची केवळ बचत करून चालणार नाही तर त्याची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जर महागाईचा दर पाच टक्के आहे असे गृहित धरले आज वाचवलेले रुपये 1,00,000 आजपासून दहा वर्षांनी रुपये 61,391 एवढेच त्याचे मूल्य झालेले असेल. म्हणजेच जर आपल्याला रू. 1,00,000 वस्तू खरेदी करावयाच्या असतील तर त्यासाठी आजपासून दहा वर्षांनी 1,61,000 द्यावे लागतील.
जीवनशैलीवर होणारा खर्च सातत्याने वाढत चालला आहे. गेल्या वीस वर्षात पेट्रोलचे दर चौपट झाले आहेत व सिनेमाचे तिकीटाचे दर पाच ते दहा पटीने वाढले आहेत. आपली तब्येत निरोगी ठेवण्यासोबत आर्थिक नियोजन नीट केले नाही तर जवळपास 63 दशलक्ष नागरिक गरिबीच्या दिशेने ढकललेले जाऊ शकतील.
कारण स्वतःवर होणारा वैद्यकीय खर्च, त्यांची संपूर्ण संपत्ती नष्ट करत आहे. वैद्यकीय विम्याचा खर्चही सातत्याने वाढत चालला आहे. येणाऱ्या काळातही हा खर्च 10 ते 15 टक्के प्रतिवर्ष या वेगाने वाढणारा आहे.
आपल्या निवृत्तीसाठी पुरेशी संपत्ती जर आपण साठवली नाही तर निवृत्तीनंतरचा काळ अत्यंत कठीण असू शकतो व आपल्याला दुसऱ्यावर विसंबून राहण्याची शक्यता वाढते. यासगळ्यासाठी आपल्या निवृत्तीच्या पैशाची योग्य अशी गुंतवणूक वृद्धीसाठी करणे आवश्यक आहे.
गुंतवणूक कुठे करावी.
निवृत्तीपूर्वी काय कराल
- पयोग्य गुंतवणूक पर्यायाचा शोध घ्या.
- पआपली निवृत्तीची वेळ ठरवा व त्यानुसार योग्य नियोजन करा.
- पशिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करा.
- पबाजारात वेळ साधण्याची धडपड करू नका.
- पआपल्या वयानुसार गुंतवणुकीमधील जोखिम वाढवा.
निवृत्तीनंतर काय कराल?
- पआपली जोखिम घेण्याची क्षमता लक्षात घ्या.
- पआपल्या गरजेनुसार मासिक पैशांची सोय करा.
- पनिवृत्तीनंतरही शिस्तबद्ध पद्धतीनेच पैसे खर्च करा.
- पआपण निवडलेल्या गुंतवणूक पर्यायाच्या परताव्याप्रमाणेच दरमहा पैशाच्या खर्चाचे नियोजन करा.
आपले आयुर्मान वाढत जाणार असेल तर शेवटपर्यंत आपल्यासाठी पैसा पुरला पाहिजे. यासाठी योग्य पर्याय व त्याचे नियोजन आवश्यक आहे.