कलाकारांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचं भान ठेवावं
मुंबई: काही कलाकारांनी ‘#पुन्हानिवडणूक’ हा ट्विटर ट्रेंड सुरू केला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी जनतेची माफी मागावी. कलाकारांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचं भान ठेवावं. या ट्रेंडमुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगले तापले असताना, सोशल मीडियावर #पुन्हानिवडणूक असं ट्विट करण्यात येतंय. निवडणुकी नंतर राज्यात कोणताही पक्ष सत्तास्थापन करू न शकल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अश्यातच मराठी कलाकारांकडून एकाचवेळी ट्विटरवर “#पुन्हानिवडणूक” असं ट्विट करण्यात आलं आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अकुंश चौधरी, सिद्धार्थ जाधव अशा अनेक कलाकारांनी सकाळी १०:३० ते ११ च्या दरम्यान #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत ट्विट केलं आहे. त्यामुळे हा विषय सध्या चर्चेचा ठरला आहे.
काही कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा ट्विटर ट्रेंड सुरू केला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी जनतेची माफी मागावी. कलाकारांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचं भान ठेवावं. या ट्रेंडमुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.@meSonalee @SaieTamhankar @imAnkkush @SIDDHARTH23OCT
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 15, 2019