मटणाला मोठी मागणी, पुरवठा कमी
वाघळवाडी (वार्ताहर) – हवेत गारवा वाढला असून थंडी वाढल्याने मांसाहारी पदार्थांची मागणी वाढली आहे. यामध्ये मासे, मटण, चिकन, गावरान चिकन यांच्या दरात चांगलीच वाढ झाली. परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पहिले भाजीपाला, कांदेनंतर मटाच्या किमतीत वाढल्या आहेत.
दसऱ्यापूर्वी मटण 480 किलो होते तर आता किलोमागे 20 ते 40 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. 520 रुपये किलोपर्यंत मटणाचे दर पोहोचले आहेत. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे मटणाचे दर वाढले हे मूळ कारण असल्याचे विक्रेते सांगत आहेत. त्याचबरोबर बकरे, बोकडांच्या चामड्याच्या फॅक्टरी बंद झाल्याने चामड्याची विक्री कमी झाली आहे. चामड्याचा रेट 300 वरुन 10 रुपयांपर्यंत आल्यामुळे मटण विक्रेत्यांनी मटणाचे भाव वाढवले आहेत. याशिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर बकऱ्यांचा आणि बोकडांचा बळी गेल्याने बाजारात त्यांची आवक कमी झाली आहे.
कमी पुरवठ्यामुळेही भाववाढ झाली आहे. याशिवाय आषाढानंतर कार्तिक महिन्यापर्यंत अनेक सण उत्सव असल्याने त्यापूर्वीच मटणाला मागणी वाढते आणि त्यापाठोपाठ मटणाचे दरही वाढतात.तसेच थंडीच्या दिवसात नदी किंवा समुद्रातील मासे तळाशी जातात, त्यामुळे मासेमारीत घट होते. त्यामुळे ऊर्जेसाठी खवय्ये मांसाहाराकडे वळतात, त्यामुळे मटणाला मागणी वाढते आणि मटणाचे दर वाढतात.
गावरान कोंबडी नुसत कापून तुकडे करून घेण्यासाठी ही 50 रुपये मोजावे लागत आहेत. सोशल मीडियावरती मटणाच्या दराबाबत चर्चा होत. मटण खाणाऱ्यांच्या खिशाला दरवाढीमुळे कात्री लागणार आहे. 31डिसेंबरपर्यंत अजुन मटणाची दरवाढ दिसेल कारण नवीन बकरी बाजारात अजून उपलब्ध नसून त्यांची पैदास होऊण बाजारात येईपर्यंत फेब्रुवारी महिना उजाडणार, असे सांगितले जात आहे.
मटण दरवाढीमागची खरी पार्श्वभूमी
शेतकरी गोठ्यामध्ये नेहमी एक तरी शेळी असायची पण आता आधुनिकीकरणामुळे शेळीपालनाकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. शेळीला मोठ्या प्रमाणावरती पूर्वी गवात खायला असायचे, पण आता तणनाशकांचा वापरामुळे गवत उपलब्ध होत नाही. काही वर्षांपूर्वी कुटुंबांमध्ये महिन्याकाठी एकदा मटणाचा बेत केला जायचा पण आता सर्रास आठवड्यातील दोन ते तीन दिवस मांसाहार हा घरांमध्ये केला जातो. सहकुटुंब हॉटेलमध्ये जेवण्याचे प्रमाणही वाढले आहे आठवड्यातील एक ते दोनवेळा सहकुटुंब हॉटेलमध्ये जेवणाचा बेत असतो.