नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची धुरा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सांभाळली आहे. याबाबतीत माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांनी एक अजीब दावा केला आहे. सेहवागने १३ वर्षांपूर्वीच सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष बनणार असल्याची भविष्यवाणी केली असल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हेतर एक दिवस सौरव गांगुली मुख्यमंत्री पदावर विराजमान होईल. ही भविष्यवाणी सत्यात उतरण्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
वीरेंद्र सेहवागने म्हंटले कि, सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष होणार असल्याचे मी जेव्हा पहिल्यांदा ऐकले तेव्हा मला २००७ सालची एक घटना आठवली. आफ्रिका दौऱ्यादरम्यान कसोटी सामन्यामध्ये मी आणि वसीम जाफर लवकर आउट झालो होतो. सचिन तेंडुलकर चौथ्या नंबरवर फलंदाजी करणार होते. परंतु, ते काही कारणास्तव येऊ शकले नाही. यामुळे गांगुली चौथ्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरणार होते. या सामन्यात गांगुली यांची कमबॅक सिरीज असल्याने त्यांच्यावर मोठा दबाव होता. परंतु, या सामन्यात गांगुलीने अत्यंत उत्तम पद्धतीने गोलंदाजी आणि दबावाचे व्यवस्थापन केले ते फक्त गांगुलीच करू शकत होता.
कसोटीनंतर ड्रेसिंग रूममध्ये आम्हा सर्व खेळाडूंमध्ये कोणी बीसीसीआयचा अध्यक्ष बनू शकतो तर ते केवळ दादाच आहेत. तसेच ते एक दिवस नक्कीच बंगालचे मुख्यमंत्री बनतील, असेही सेहवाग यांनी म्हंटले होते.
दरम्यान, भारतीय क्रिकेटची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुलीसमोर राहणार आहे. आगामी दहा महिन्यांच्या त्याच्या कार्यकाळात त्याला मंडळाचे कामकाज, युवा खेळाडुंचा विकास, मानधन, स्पर्धांमध्ये वाढ तसेच देशांतर्गत स्पर्धेत महिला क्रिकेटसाठी भरीव कामगिरी करण्यासाठी गांगुली सज्ज झाला आहे.