नवी दिल्ली : पंजाब महाराष्ट्र सहकारी बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने घातलेल्या निर्बंधामुळे खातेधारकांना अनेक समस्यांना सामाना करावा लागत आहे. दरम्यान, पीएमसीच्या आणखी एका खातेदाराच्या मृत्यू झाला आहे. बँकेतून पैसे न काढता आल्यामुळे मुरलीधर यांचा हृदयविकाराच्या झटक्या मुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी देखील तीन खातेदारांनी आपला जीव गमावला आहे.