लिंब ग्रामस्थांचा सवाल; दोन्ही राजांना मताधिक्य देण्याचा निर्धार
सातारा – लिंब आणि राजघराणे याचे एक अतूट आणि आपुलकीचे नाते आहे. लिंब गावचं महाराजांचे आहे. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून लिंबमध्ये अनेक विकासकामे झाली आणि यापुढेही होणार आहेत. मागच्या निवडणुकीपुरते उगवलेले दीपक पवार याही निवडणुकीत उगवले आहेत. पाच वर्ष पवार तुम्ही कुठे गायब होता? असा खोचक सवाल करतानाच लिंब गावातून दोन्ही राजेंच्या कमळालाच मताधिक्य मिळेल असा निर्धार लिंब येथील महिला मेळाव्यात ग्रामस्थांनी केला.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ लिंब येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यास सौ. वेदांतिकाराजे भोसले, सौ. दमयंतीराजे भोसले, भाजपच्या प्रदेश प्रभारी नीता केळकर, जेष्ठ नेत्या कांताताई नलावडे, सुवर्णा पाटील, चंद्रलेखा माने-कदम, मिसेस मुख्यमंत्री फेम सुमी, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेरमन सर्जेराव सावंत, भाजपचे राजू शेटे, प्रदीप पाटील, पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब गोसावी, प्रदीप वंजारी, अण्णाबापू सावंत, सरपंच अनिल सोनमळे, उपसरपंच उज्वला शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या, दर पाच वर्षानंतर निवडणूक लागली की विरोधकांची पिकनिक चालू होते आणि मतदानाद्वारे जनता त्यांना घरी पाठवते. त्यामुळे लिंब ग्रामस्थांनी उपस्थित केलेला सवाल खूप महत्वाचा आहे. निवडणुकीपुरते घिरट्या घालणाऱ्यांनी आजपर्यंत जनतेसाठी काय केलं हा महत्वाचा प्रश्न आहे. शिवेंद्रराजेंनी काय केलं हे जनतेला माहिती आहे आणि शिवेंद्रराजे स्वतःही सांगत आहेत. त्यामुळे शिवेंद्रराजेंनी काय केलं यापेक्षा विरोधकांनी आजवर काय केलं हे एकदा सांगण्याच धाडस दाखवावं, असे आव्हान सौ. वेदांतिकाराजे यांनी दिले.
सौ. दमयंतीराजे म्हणाल्या, दोन्ही राजेंच्या माध्यमातूनच विकासकामे होणार आहेत. गतिमान विकास व्हावा यासाठीच दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आम्ही दोघींनी दोन्ही राजे एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याला आज यश आले असून आता दोघे कायम एकत्र राहतील आणि संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट करतील. त्यासाठी सर्वांनी कमळा समोरील बटन दाबून आपल्या लाडक्या राजेंना विजयी करा, असे आवाहन सौ. दमयंतीराजे यांनी केले.
यावेळी कांताताई नलवडे, सौ. पाटील, बाळासाहेब गोसावी, सर्जेराव सावंत आणि मान्यवर महिला व ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त करून दोन्ही राजेंना मताधिक्य देण्याचा निर्धार केला.
जितेंद सावंत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि सोसायटीचे सर्व संचालक यांनी परिश्रम घेतले. मेळाव्यास सोसायटीचे चेरमन दत्तात्रय सावंत, बाळासाहेब धावरे, बापूराव बरकडे, गुलाबराव पाटील, सुरेश सोनमळे, माजी सभापती दादा शेळके, मारुती झोरे, ज्ञानदेव वणवे, प्रकाश शिंदे, आनंदराव सावंत, लताताई सावंत, रेश्मा निकम, वंदना सावंत, तुळसाबाई सरगर, सुमन सोनमळे, आशा धुमाळ, विमल सावंत यांच्यासह लिंब पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.