जिनिव्हा : संयुक्त राष्ट्रेचे सरचिटणीस ऍन्टोनअिो गुटेर्स यांनी भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबाबत चिंता व्यक्त केली. काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास नकार देत हा प्रश्न दोन्ही राष्ट्रांनी संवादाने सोडवावा, असे आवाहन केले.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाबाबत त्यांना (ऍन्टोनिओ गुटेर्स) चिंता वाटत आहे. दोन्ही राष्ट्रांनी संवादाने हा प्रश्न सोडवावा, असे संयुक्त राष्ट्रेचे मुख्य प्रवक्ते स्टिफन दुर्जारिक यांनी सांगितल्याचे वृत्त पीटीआयने दिले.
दुर्जारिक यांना काश्मीर प्रश्नात गुटेर्स मध्यस्थी करणार का? असे विचारता ते म्हणाले, तुम्हाला मध्यस्थीबाबत आमची भूमिका माहीत आहे. ती नेहमीच कायम आहे. 1972च्या सीमला करारानुसार हा प्रश्न द्विपक्षीय चर्चेने सोडवला पाहीजे. त्यात मध्यस्थीची गरज आम्हाला वाटत नाही.