नवी दिल्ली – कलाम ३७० रद्द केल्यानंतर भाजपचा पुढील अजेंडा पाकव्याप्त काश्मीरला केले आहे. या अजेंड्याला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीदेखील खुले समर्थन दिले आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) भारताचा अविभाज्य भाग आहे. आणि आता आपल्याला पीओके परत घ्यायलाच पाहिजे, असे व्यंकय्या नायडू यांनी म्हंटले आहे. आंध्रप्रदेशस्थित विशाखापट्टममध्ये नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेतील ते एका कार्यक्रमात बोलत होते.
व्यंकय्या नायडू म्हणाले कि, पाकिस्तानसोबत चर्चा झालीच तर केवळ पीओकेबाबत होईल. पीओके भारताचा अविभाज्य भाग आहे. आणि आता आपल्याला पीओके परत घ्यायलाच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
I am delighted to be here with you all at this golden jubilee celebrations of Naval Science & Technological Laboratory, a prestigious institution of the Defence Research and Development Organization. This indeed is a moment to cherish and rejoice for the entire NSTL fraternity. pic.twitter.com/atfMdILVBy
— VicePresidentOfIndia (@VPSecretariat) August 28, 2019
दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही काही दिवसांपूर्वी पीओकेवर वक्तव्य केले होते. पाकिस्तान दहशतवाद्यांविरूद्ध आणि दहशतवादी कारवायांना पाठिंबा देत नाही तोपर्यंत चर्चा होणार नाही. तसेच भविष्यात पाकिस्तानशी चर्चा झाल्यास ते पीओकेबद्दल बोलतील, इतर कोणत्याही मुद्यावर नाहीत, असेही राजनाथ सिंह म्हणाले होते.