मुंबई – मुंबईहून कोल्हापुरकडे रवाना झालेल्या ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’ मध्ये अडकलेल्या 2000 प्रवाशांची तब्ब्ल 17 तासानंतर सुटका करण्यात आली आहे. डब्यांमध्ये बदलापूर-कर्जत मार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकाजवळ पाणी शिरले होते. पुरात अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी एनडीआरएफच्या टीम कडून युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले होते. आणि रेल्वेतील सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली.
दरम्यान, त्यांच्या या कामगिरीबद्दल बॉलिवूडचे महानायक ‘अमिताभ बच्चन’ यांनी आपल्या ट्विटर आकाउंटरुन एनडीआरएफच्या जवानाचं कौतुक केले आहे.
T 3239 – Congratulations to the NDRF team .. they have successfully rescued 700 passengers from the Mahalaxmi Express .. !! Well done NDRF, Navy, IAF, Railways & State Admin ..THIS IS A BRAVE AND SUCCESSful OPERATION !! filled with pride ..JAI HIND !!?????????
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 27, 2019