मुंबई – मुंबईहून कोल्हापुरकडे रवाना झालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या काही डब्यांमध्ये बदलापूर-कर्जत मार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकाजवळ पाणी शिरले आहे. पुरात अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले असून, सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रवाशांना सुखरूप घराकडे रवाना करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून कल्याणहून कोल्हापूरकडे 19 डब्यांची विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे.
Central Railway Chief Public Relations Officer on #MahalaxmiExpress rescue operation: A special train with 19 coaches will leave from Kalyan to Kolhapur with the passengers of Mahalaxmi Express. #Maharashtra pic.twitter.com/lKFs8y54hc
— ANI (@ANI) July 27, 2019
रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांच्या सेवेसाठी 37 डॉक्टर्स आणि अॅम्ब्युलन्सही घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच 14 बस आणि 3 टेम्पोच्या सहाय्याने प्रवाशांना सह्याद्री मंगल कार्यालय येथे पाठविण्यात येत असून याठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.