फलटण : पंढरपूरची वारी हा एक अद्भूत सोहळा असतो. दिंड्या-पताकांबरोबर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या जयघोषात लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात. पंढरपूरला जाताना माऊलींची पालखी अनेक गावांमध्ये मुक्कामी थांबत असते. यावेळी वारकरी देखील मुक्क्मासाठी गावातील नागरिकांच्या घरी राहतात. दरम्यान, फलटणमधील अश्याच एका कुटुंबाशी केलेली ही खास बातचीत…
साधू संत येती घरा तोच आमच्यासाठी दिवाळी-दसरा. वारकऱ्यांच्या सेवेतच विठ्ठलाची सेवा वाटते. या दिवसाची आम्ही वर्षभर वाट पाहतो अश्या भावना फलटणकरांनी व्यक्त केल्या आहे.