मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना राष्ट्रीय तपास संस्था एनआयएच्या विशेष कोर्टाने दणका दिला आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतर आरोपीना आठवड्यातून एकदा कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे. सुनावणी दरम्यान आरोपी कोर्टात हजर नसल्यामुळे कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 मे रोजी घेतली जाणार आहे.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणी काही वर्षांपूर्वी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा व इतर सहा जणांना यूएपीए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती.