पुणे : धरणातील पाणीसाठा खालावला असल्याने शहरातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री गिरिश बापट यांनी आज तातडीची बैठक बोलाविली आहे. दुपारी साडेतीन वाजता महापालिका आयुक्त कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीस पाटबंधारे विभागाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत 20 टक्के साठा शिल्लक असून हे पाणी जुलै 15 पर्यंत पुरेल याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, पावसाळा लांबल्यास अडचण होण्याची शक्यता असल्याने पाटबंधारे विभागाने कपात वाढविण्याची मागणी केली आहे. त्यासाठी उद्या ( शनिवारी) ही बैठक होणार होती. मात्र, आज अचानक साडेतीन वाजता ही बैठक बोलाविण्यात आली आहे.