Indian Cricket Team & ICC Trophy : अलीकडेच, भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाला होता. भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 7 विकेट्सने पराभव झाला. सुमारे 11 वर्षांपूर्वी टीम इंडिया शेवटच्या वेळी आयसीसी ( ICC ) ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरली होती, तेव्हापासून भारतीय संघ आयसीसी ( ICC ) बाद फेरीत सतत पराभूत होत आहे. पण आता रोहित शर्माच्या संघाला आयसीसी ट्राफी जिंकण्याची चांगली संधी आहे. वास्तविक, आगामी 15 महिन्यांत 3 आयसीसी ट्रॉफी खेळल्या जाणार आहेत. ज्यामध्ये टी-20 (T20 WC) वर्ल्ड कप व्यतिरिक्त, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा समावेश आहे.
टीम इंडिया 11 वर्षांचा दुष्काळ संपवणार!
आयपीएल 2024 हंगामानंतर टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा खेळवली जाईल. 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीवर टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. T20 विश्वचषक जिंकून भारतीय संघाला 11 वर्षांचा आयसीसी ट्राफीचा दुष्काळ संपवण्याची संधी मिळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मोठा दावेदार म्हणून स्पर्धेत उतरणार आहे. यानंतर पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन केले जाणार आहे. पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणार आहे.
भारतीय संघाची ‘या’ आयसीसी स्पर्धांवर आहे नजर…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2024-25 चा अंतिम सामना T20 वर्ल्ड कप आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर खेळवला जाईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2024-25 चा अंतिम सामना जून 2025 मध्ये खेळवला जाणार आहे. त्याच वेळी, इंग्लंडचे लॉर्ड्स स्टेडियम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करेल.
अशा प्रकारे भारतीय संघाला पुढील 15 महिन्यांत 3 आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी असेल. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी जिंकून 11 वर्षांचा दुष्काळ संपवू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.