Myanmmar Plane Crash : भारताचे ईशान्यकडील राज्य मिझोराममधील लेंगपुई विमानतळावर आज एक मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. राजधानी आयझॉलजवळील लेंगपुई विमानतळावर म्यानमार लष्कराचे विमान कोसळले. लेंगपुई विमानतळ हे आयझॉल जवळ स्थित देशांतर्गत विमानतळ आहे. गेल्या आठवड्यात भारत-म्यानमार सीमा ओलांडून मिझोराममध्ये घुसलेल्या सैनिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी लष्करी विमान म्यानमारहून आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मिझोरमचे डीजीपी म्हणाले, ‘म्यानमार आर्मीच्या विमानाच्या अपघातामुळे सहा जण जखमी झाले आहेत. विमानात पायलटसह 14 जण होते. जखमींना लेंगपुई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्यानमारमध्ये लष्कर आणि बंडखोरांमध्ये चकमक सुरू आहे, त्यामुळे सैनिकांनी पळ काढला आणि मिझोरामच्या लांगतलाई जिल्ह्यात प्रवेश केला, असे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. या सैनिकांना घेण्यासाठी विमान भारतात आले होते.
🚨 Breaking ✈️🪖
This morning , a Myanmar military plane dispatched to retrieve soldiers who had crossed over to avoid opposition forces skidded off the runway at Lengpui airport in #Mizoram. Out of the 13 crew members, 8 are injured pic.twitter.com/KcIgLPcDwb
— OsintTV 📺 (@OsintTV) January 23, 2024
म्यानमारचे २७६ सैनिक मिझोराममध्ये घुसले
समोर आलेल्या माहितीनुसार लष्करी विमान भारतात घुसखोरी केलेल्या लष्कराच्या जवानांना घेण्यासाठी आले होते. लेंगपुई विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना विमानाचा अपघात झाला. आसाम रायफल्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की भारताने म्यानमारच्या 184 सैनिकांना त्यांच्या देशात परत पाठवले आहे. गेल्या आठवड्यात म्यानमारचे २७६ सैनिक मिझोराममध्ये दाखल झाले होते, त्यापैकी १८४ सैनिकांना सोमवारी परत पाठवण्यात आले.
आसाम रायफल्सच्या कॅम्पमध्ये सैनिक होते
म्यानमार लष्कराच्या सैनिकांची छावणी ‘अरकान आर्मी’च्या सैनिकांनी ताब्यात घेतली. यानंतर ते मिझोराममध्ये आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, म्यानमारच्या सैनिकांना जवळच्या आसाम रायफल्सच्या छावण्यांमध्ये हलवण्यात आले आणि त्यातील बहुतेकांना नंतर लुंगलेई येथे पाठवण्यात आले. तेव्हापासून हे सैनिक आसाम रायफल्सच्या निगराणीखाली आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या 276 सैनिकांना शनिवार आणि रविवारी लेंगपुई विमानतळावरून म्यानमारच्या आयझॉल येथे आणण्यात आले.