नवी दिल्ली :– देशांतर्गत स्पर्धेत पुन्हा एकदा सरस कामगिरी करत भारतीय संघात पुनरागमन करण्याचे भुवनेश्वर कुमारचे स्वप्न भंग झाले आहे. संघात जसप्रीत बुमराह, महंमद शमी व महंमद सिराज असे तीन वेगवान गोलंदाज असताना भुवनेश्वरला संधी मिळण्याची शक्यता जवळपास संपूष्टात आली आहे.
त्याला कसोटी संघासाठीही विचारात घेतले जात नसून एकदिवसीय व टी-20 सामन्यांसाठीही गेल्या दोन मोसमांपासून त्याचा विचार झालेला नाही. त्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास संपूष्टात आल्याचेच दिसत आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात उद्यापासून पाच टी-20 सामन्यांची मालिका भारतीय संघ खेळणार असून प्रमुख खेळाडूंना विश्रांती देताना नवोदितांचा भरणा असलेला संघ बीसीसीआयने जाहीर केला. या मालिकेसाठी भारताचा टी-20 संघ निवडताना निवड समितीने भुवनेश्वर कुमारला संधी दिली नाही. गेल्या तीन ते चार मोसमांपासून सातत्याने त्याला डावलले जात आहे. त्यामुळे भुवनेश्वरला संधी मिळण्याची शक्यता जवळपास संपूष्टात आली आहे.
#CWC2023 #INDvAUS Final : कर्णधार रोहितच्या बाद होण्यावर गावसकरांचे मत, म्हणाले “तो फटका…”
33 वर्षीय भुवनेश्वर कुमारने 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. आतापर्यंत त्याने 21 कसोटीत 63 विकेट्स, 121 एकदिवसीय सामन्यांमध्ये 141 बळी आणि 87 एकदिवसीय सामन्यांमध्ये 90 बळी घेतले आहेत. भुवी हा भारताकडून टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज आहे. वर्षभरापूर्वी शेवटचा टी-20 आणि एकदिवसीय सामना खेळलेल्या भुवीने 5 वर्षांपूर्वी 2018 मध्ये शेवटची कसोटी खेळली होती.