मुंबई :- लोकेश राहुलची विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघात निवड केल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले असेल मात्र, आम्हाला त्याच्यावर विश्वास असून तो निश्चितच सरस कामगिरी करेल, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिली आहे.
दरम्यान, एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाल्यावर लगेचच चाहत्यांनी त्यावर आपली मते मांडायला सुरुवात केली आहे.
सातत्यपूर्ण कामगिरी केल्यावरही संजू सॅमसनला सातत्याने संघातून वगळले जात आहे. लोकेश राहुल चार महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले असले तरीही त्यापूर्वीची त्याची कामगिरी अत्यंत सुमार होती.
मात्र, केवळ बीसीसीआयच्या नियमानुसार एखादा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेला असेल तर तंदुरुस्त ठरल्यावर त्यालाच प्राधान्य दिले जाते, या निकषावरही चाहत्यांनी बीसीसीआयवर ताशेरे ओढले आहेत.