रायगड – खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. तसेच परिसरात अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहेइर्शाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणी एनडीआरएफ २ पथके पोहचली आहेत. गावात जाण्यासाठी रस्ता नाही. सुमारे १७ घरावर दरड कोसळली आहे. दोन भागात. आणखी दोन पथके पोहोचतील. गावात जाण्यासाठी पायवाट असल्याने मदत साहित्य पोहचण्यास उशीर होत आहे. आणखी दोन पथके पोहचत आहेत.
दरम्यान घटना स्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह इतर मंत्री घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इरसालवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडलीये. दरडीखाली 30 ते 40 घरं दबल्याचा अंदाज आहे.
हा आदिवासी पाडा असून यथे साधारण 250 लोकं राहातात. अग्निशमन दलाच्या एका जवानाचा आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचताना दम लागल्यानं मृत्यू झाल्याचंही समजत समोर येत आहे.