ओव्हल -बीसीसीआयने विराट कोहलीवर अन्यायच केला. त्याच्याकडून नेतृत्व काढून घेण्यापूर्वी कोणताही संवाद साधला गेला नाही. केवळ वर्कलोड कमी करण्यासाठी त्याने टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचे सुतोवाच केले; परंतु सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयने त्याच्याकडून एकदिवसीय तसेच कसोटी संघाचेही कर्मधारपद काढून घेतले, असे ऑस्ट्रेलियाची माजी कसोटी क्रिकेटपटू जस्टिन लॅंगर यांनी म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागल्यावर केवळ रागाच्या भरात कोहलीनेही कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान त्याच्या आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील वादाची बातम्याही समोर येत होत्या.
कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर माध्यमांसमोर गांगुली यांनी अनावश्यक वक्तव्यही केली होती व तेथूनच वादाला सुरुवात झाली. बीसीसीआयने कोहलीवर अन्याय केल्याचे त्याने अंतिम सामन्यातील समालोचनादरम्यान लॅंगर यांनी सांगितले व पुन्हा एकदा या चर्चेला गती मिळली.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकल्यावर रोहतने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व पुन्हा एकदा कोहली व रोहित यांची तुलना सुरु झाली. त्यातच या सामन्यात रवीचंद्रन अश्विनला संघात न घेण्याचा निर्णयावरही पडसाद उमटले.