मुंबई – सध्या राज्यातील राजकीय समीकरण बदलत्यांना दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची काही दिवसांपूर्वी मुंबईतील ‘ग्रॅण्ड हयात’मध्ये बैठक घेतली होती. यावेळी आगामी मुंबई महापालिका आणि इतर महापालिका निवडणुकीतील आघाडीच्या विषयावर ही चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती.
या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येणार असल्याचा चर्चाही रंगल्या होत्या. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केल आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले,’आम्ही एकनाथ शिंदेंसोबत यांच्यासोबतही बसायला तयार आहोत. पण आमचे भाजपासोबत आमचं कधीच जमणार नाही. ते पुढे म्हणाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे लोकांची काम करण्यासाठी भेटावं लागतं त्याचा वेगळा अर्थ नको. ‘ असं म्हणत त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
तर ठाकरे-आंबेडकर घराण्याचा तीन पिढ्यांपासूनच्या नात्याचा वारसा सांगत सेना-वंचितचे आगामी काळात एकत्र येण्याचे संकेत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा डाव टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. अशी चर्चा रंगली आहे.