नवी दिल्ली – कोविड-19 महामारीच्या काळात तुरुंगातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने सोडण्यात आलेल्या सर्व दोषी आणि खटल्यातील कैद्यांनी 15 दिवसांच्या आत आत्मसमर्पण करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
न्यायमूर्ती एमआर शहा आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, साथीच्या काळात आपत्कालीन जामिनावर सुटलेले अंडरट्रायल कैदी, त्यांच्या आत्मसमर्पणानंतर सक्षम न्यायालयांसमोर नियमित जामिनासाठी अर्ज करू शकतात. शिक्षेच्या स्थगितीबाबतही ते कोर्टात जाऊ शकतात असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
राजकीय हेतूंसाठी कायदेशीर प्रक्रियांचा वापर; कपिल सिब्बल यांचा आरोप
कोविडच्या काळात महामारी फैलावू नये म्हणून कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी करावी अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या एका उच्च स्तरीय समितीने केली होती. त्याचा स्वीकार करून कोर्टाने हे कैदी सोडून देण्याचा आदेश दिला होता.