मुंबई ( Chhatrapati Sambhajiraje on Jitendra Awhad ) – “जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील,’ असे ट्वीट संभाजीराजे छत्रपती यांनी करून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आव्हाड यांना फटकारले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून त्यांच्या या वक्तव्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. त्याचबरोबर आव्हाडांविरोधात अनेक आंदोलने देखील करण्यात आली आहेत.
भाजपनेही आव्हाडांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असे आव्हाडांकडू सांगण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत आता माजी खासदार व स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनीही प्रतिक्रिया देत त्यांना फटकारल्याने या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.