Jitendra Awad on PM । लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. त्यानंतर आता सर्वजण येत्या २६ एप्रिल रोजी पुढच्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचार करत आहेत. या सभांमध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हजेरी लावताना दिसून येत आहेत. दरम्यान, राजस्थानमध्ये झालेल्या प्रचारसभेत मोदींनी केलेल्या विधानावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय. “काँग्रेस सत्तेत आली, तर जनतेचा पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना वाटून टाकेल”, असे म्हटले आहे. त्यांच्या या टीकेवर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालीय.
पंतप्रधानांचे भाषण पदाला न शोभणारे Jitendra Awad on PM ।
नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर जितेंद्र आव्हाड हे चांगलेच संतापले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी,“आज देशाच्या पंतप्रधानांनी केलेले भाषण हे पदाला शोभणारे नक्कीच नव्हते. भाषणात मुस्लिम समाजाकडे बोट दाखवताना “घुसपेठीया” या शब्दाचा त्यांनी प्रयोग केला. जे विधान काँग्रेसकडून कधी केले नव्हते. ते काँग्रेसच्या नावावर ढकलून, राष्ट्राची संपत्ती मुस्लिमांना वाटणार होते, असे सांगून टाकले. हे सर्व करताना त्यांना कुठला आनंद किंवा कुठले सुख मिळते, हेच कळत नाही.” असे म्हटले.
आज देशाच्या पंतप्रधानांनी केलेले भाषण हे पदाला शोभणारे नक्कीच नव्हते. भाषणात मुस्लिम समाजाकडे बोट दाखवताना “घुसपेठीया” या शब्दाचा त्यांनी प्रयोग केला. जे विधान काँग्रेसकडून कधी केले नव्हते. ते काँग्रेसच्या नावावर ढकलून , राष्ट्राची संपत्ती मुस्लिमांना वाटणार होते, असे सांगून… pic.twitter.com/bNWmbxf8bR
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 21, 2024
…तर हे या देशाचे दुर्दैवं Jitendra Awad on PM ।
पुढे बोलताना त्यांनी, “जेव्हा देशाला सांगण्यासारखे काहीच नसते; तेव्हा आपल्या कामांबद्दल न बोलता केवळ हिंदू-मुस्लीम द्वेष पसरविणे हा जर पंतप्रधानांचा उद्देश असेल तर हे या देशाचे दुर्दैवं आहे. एवढं सगळं बोलल्यानंतरही निवडणूक आयोगाला जाग येईल, असे काही वाटत नाही. पण, देशातील निवडणुका आता फक्त द्वेष या एकाच विषयावर लढविल्या जाणार आहेत. कारण की, निवडणुकांमध्ये बदललेली परिस्थिती आणि त्यामुळे सरकलेली पायाखालची वाळू याकडे पाहता त्यांना द्वेष पसरविण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या भाषणात , “पूर्वी जेव्हा त्यांचं सरकार होतं, तेव्हा ते म्हणाले होते की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. संपत्ती एकत्र करून हे कोणाला वाटणार? याचा अर्थ ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना ही संपत्ती वाटणार. घुसपेठियांना (घुसखोरांना) वाटणार.” असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसंच, त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.