मुंबई – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आजपासून (मंगळवार) महाराष्ट्राची मुंबईशी लढत होणार आहे. हे दोन संघ एकाच राज्याचे असले तरीही कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. आजपासून सुरु होणारा सामना दोन्ही संघांसाठी जिंकणे महत्वाचे बनले आहे. यात जो संघ विजय मिळवेल तो संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहे.
IND vs NZ 2023 । टीम इंडियाला निर्विवाद वर्चस्वाची संधी; उद्या तिसरा एकदिवसीय सामना
महाराष्ट्राने हैदराबादचा पराभव केला होता व महत्वाचे गुणही मिळवले मात्र, तरीही त्यांना हा सामना जिंकणे आवश्यक बनले आहे. दुसरीकडे मुंबईला दिल्लीकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांनाही ही लढत जिंकून जास्तीत जास्त गुण मिळवावे लागणार आहेत. हैदराबादविरुद्धच्या लढतीपूर्वी महाराष्ट्र व तमिळनाडू यांच्यातील सामना अनिर्णित राहिला होता. आता मुंबईविरुद्धच्या या सामन्यातून महाराष्ट्राला महत्वाचे गुण मिळाले तरच बाद फेरीत स्थान मिळवण्याची संधी राहणार आहे.
IND vs NZ 2023 | भारतीय खेळाडू बाबा महाकालच्या दर्शनाला; ऋषभ पंतसाठी केली प्रार्थना
यंदाच्या मौसमापासून रणजी करंडक स्पर्धा पारंपरिक रचनेनूसार खेळवली जात असल्याने प्रत्येक संघाला ठरावीक सामने होम व एवे पद्धतीने खेळायला मिळत आहेत. त्यामुळे या सामन्यात घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ महाराष्ट्राला होणार आहे. या स्पर्धेत सलामीच्या लढतीत महाराष्ट्राने दिल्लीचा पराभव करत थाटात सुरूवात केली होती. त्यानंतर सौराष्ट्रविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला होता.
त्यानंतरच्या लढतीत महाराष्ट्राने आंध्र प्रदेशचा पराभव केला होता. आसामविरुद्धची लढत अनिर्णित राहिली असली तरीही यातून महाराष्ट्राने महत्वाच्या गुणांची कमाई केली. तसेच त्यानंतर झालेला तमिळनाडूविरुद्धचा सामनाही अनिर्णित राहिला. हैदराबादविरुद्धचा सामना महाराष्ट्राने निर्विवाद जिंकला होता.
ऋतुराजच्या कामगिरीकडे लक्ष
यंदाच्या मौसमात महाराष्ट्राचा स्टार फलंदाज ऋतूराज गायकवाड याने सरस कामगिरी केली आहे. मात्र, त्यात सातत्य राखलेले नसल्याने मुंबईविरुद्धच्या सामन्यात तो कशी कामगिरी करतो याकडे लक्ष राहणार आहे. आगामी काळात भारतीय संघ सातत्याने एकदिवसीय सामने खेळणार आहे, तसेच संभाव्य खेळाडूंनाही रोटेशनद्वारे विविध सामन्यांत संधी दिली जाणार आहे. त्यामुळे निवड समितीवर प्रभाव पाडण्यासाठी ऋतूराज कसा खेळ करतो हे पाहणे महत्वाचे राहील.