IND vs ENG – विराट कोहली यंदाच्या टी-२० विश्वचषकात चांगलाच लयीत दिसल्या. त्याने प्रत्येकवेळी संघासाठी धावा बनवल्या आहेत. आत्तापर्यंत ६ सामन्यांमध्ये विराटने २९६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम रचला आहे. विराटने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० धावांचा टप्पा गाठला आहे. क्रिकेटच्या या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा जगातील एकमेव खेळाडू आहे.
IND vs ENG । हार्दिकची तुफानी खेळी! मात्र सध्या इंग्लंड मजबूत स्थितीत
विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये ११५ सामन्यांच्या १०७ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर आता सर्वाधिक ४००८ धावा झाल्या आहेत. कोहलीने ५३ च्या सरासरीने आणि १३८ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. या यादीत विराट कोहलीनंतर आता रोहित शर्माचे नाव आले आहे. रोहितच्या नावावर ३८५३ धावा आहेत. त्याच्यानंतर न्यूझीलंडचा क्रिकेटर मार्टिन गप्टिलचे नाव येते. गप्टिलने ३५३१ धावा केल्या आहेत.
टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट गमावत १६८ धावा केल्या होत्या. कोहलीने सावध खेळ करत ४० चेंडूत ५० धावा केल्या. त्याच्याशिवाय हार्दिक पंड्याने तुफानी फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने ३३ चेंडूत ६३ धावांची दमदार खेळी केली.
मात्र, या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजीला ग्रहण लागल्यासारखे दिसले. कारण भारताचा कोणताही गोलंदाज इंग्लंडच्या अलेक्स हेल्स आणि जोस बटलरला बाद करू शकला नाही. बातमी लिहिली त्यावेळेपर्यंत इंग्लंडच्या १५९ धावांवर एकही गडी बाद नव्हता. त्यामुळे इंग्लंडला २७ चेंडूत १० धावांची गरज होती.