महिला आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतने ( Team India ) श्रीलंकन संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. यासोबतच भारताने सातव्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरण्यात यश मिळवले आहे. सामान्यांच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून श्रीलंकन संघाच्या कर्णधाराने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र श्रीलंका संघ निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून अवघ्या ६५ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २ गडी गमावून दिमाखदार विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाच्या ( Team India ) खेळाडूंनी अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला आहे.
#WomenAsiaCup | ३ षटकांत ५ धावा अन् ३ विकेट्स; रेणुका ठरली भारताच्या विजयाची शिल्पकार…
सामान्यांच्या शेवटी स्मृती मंधाना हिने विजयी षटकार खेचला आणि सामना संपवला. यानंतर मात्र तंबूत बसून असलेल्या खेळाडूंच्या आनंदाचा बांध फुटला आणि ते धावतच मैदानात पोहोचले. यानंतर सर्वच खेळाडूंनी एकमेकांना गळाभेट घेत विजयाचा आनंद साजरा केला. त्याचबरोबर बीसीसीआय वुमेनकडून एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये खेळाडूंसह कर्णधार हरमनप्रीत कौर चषकासह अनोख्या शैलीत विजयाचा जल्लोष करताना दिसत आहेत.
#WomenAsiaCup | जिंकलो रे भावा! भारताने श्रीलंकेला हरवून सातव्यांदा जिंकला आशिया चषक
Champions of Asia – Team India. pic.twitter.com/ckTMyGgwt1
— Johns. (@CricCrazyJohns) October 15, 2022
खरे तर भारताच्या ( Team India ) गोलंदाजांकडूनच सामना विजयाचा पाया रचला गेला. वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूरने एका निर्धाव षटकासह ३ षटकांत ५ धावा खर्च करत श्रीलंकेच्या ३ गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारताकडून फलंदाजी करताना सलामीवीर स्मृती मंधानाने २५ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या सहाय्याने ५१ धावांची अर्धशतकीय खेळी खेळली.
Post-win vibes, be like 🎉 🙌#TeamIndia | #AsiaCup2022 | #INDvSL pic.twitter.com/LsUG1PxNiO
— BCCI Women (@BCCIWomen) October 15, 2022
भारतीय महिला संघाने महिला आशिया चषक ( WomenAsiaCup ) स्पर्धेचे सातव्यांदा विजेतेपद जिंकले आहे. भारताने २००४, २००५-०६, २००६, २००८, २०१२ २०१६ आणि आता २०२२ मध्ये आशिया चषक स्पर्धा ( WomenAsiaCup ) जिंकण्यात यश मिळवले आहे. त्याचबरोबर २०१८ मध्ये म्हणजेच गेल्या मोसमात भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता, परंतु बांगलादेशने भारताचा पराभव करत प्रथमच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. मात्र हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात यंदाच्या हंगामात भारतीय संघाने दमदार खेळ दाखवला आहे.
#AsiaCup2022 𝗖𝗛𝗔𝗠𝗣𝗜𝗢𝗡𝗦 🏆
Well done, #TeamIndia! 👏 👏#INDvSL pic.twitter.com/qYBP4t6WMV
— BCCI Women (@BCCIWomen) October 15, 2022