WomenAsiaCup – महिला आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्या खेळाला गेला. सामन्यात भारतीय संघाने विरोधी संघाला एकतर्फी मत दिली. भारताच्या भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी अक्षरश लोटांगणंच घातले. भारतीय गोलंदाजांनी संपूर्ण सामन्यात श्रीलंकेला वर्चस्व मिळवू दिले नाही. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या श्रीलंकेला अवघ्या ६५ धावांत रोखण्यात गोलंदाजांना यश आले.
#WomenAsiaCup | जिंकलो रे भावा! भारताने श्रीलंकेला हरवून सातव्यांदा जिंकला आशिया चषक
महिला आशिया चषक ( WomenAsiaCup ) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताकडून गोलंदाजीत रेणुका सिंग ठाकूरने दमदार कामगिरी केली. तिच्या वेगवान माऱ्यासमोर कोणत्याही श्रीलंकन फलंदाजाला टिकता आले नाही. रेणुकाने ३ षटकांत ५ धाव देत ३ गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. खरे तर रेणुकाने दिलेल्या या एकानंतर एक धक्क्यामुळेच श्रीलंकन संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. त्याचबरोबर रेणुकाला साथ देताना राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद करत श्रीलंकेच्या पराभवाचा पाया रचला. रेणुका सिंग ठाकूरला तिच्या सामन्यातील दमदार कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.
3⃣ Overs
1⃣ Maiden
5⃣ Runs
3⃣ WicketsRenuka Thakur put on a stunning show with the ball & bagged the Player of the Match award as #TeamIndia beat Sri Lanka in the #AsiaCup2022 Final. 👏 👏 #INDvSL
Scorecard ▶️ https://t.co/r5q0NTVLQC pic.twitter.com/APPBolypjE
— BCCI Women (@BCCIWomen) October 15, 2022
प्रत्युत्तरात भारताच्या डावाची सुरुवातही थोडी खराबच झाली होती. कारण संघाने पहिले दोन गडी अगदी स्वस्तात गमावले. मात्र त्यांनतर सलामीवीर स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी भारताला सहज विजय मिळवून दिला. मंधानाने दमदार खेळी करत २५ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५१ धावांची अर्धशतकीय पारी खेळली. तर हरमनप्रीतने ११ धावांचे योगदान दिले.
भारतीय महिला संघाने महिला आशिया चषक ( WomenAsiaCup ) स्पर्धेचे सातव्यांदा विजेतेपद जिंकले आहे. भारताने २००४, २००५-०६, २००६, २००८, २०१२ २०१६ आणि आता २०२२ मध्ये आशिया चषक स्पर्धा ( WomenAsiaCup ) जिंकण्यात यश मिळवले आहे. त्याचबरोबर २०१८ मध्ये म्हणजेच गेल्या मोसमात भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता, परंतु बांगलादेशने भारताचा पराभव करत प्रथमच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. मात्र हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात यंदाच्या हंगामात भारतीय संघाने दमदार खेळ दाखवला आहे.
Post-win vibes, be like 🎉 🙌#TeamIndia | #AsiaCup2022 | #INDvSL pic.twitter.com/LsUG1PxNiO
— BCCI Women (@BCCIWomen) October 15, 2022