मुंबई – राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठींबा देत सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपत घेतली. मात्र राज्यात अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत भाष्य करत थेट तारीखच सांगून टाकली.
राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्यामुळे सर्व निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच घेत आहेत. अशात मुनगंटीवार यांनी १५ ऑगस्ट आधी शपतविधी करावा लागेल असं म्हंटल आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुनगंटीवार यांनी हे विधान केलं.
काय म्हणाले मुनगंटीवार नेमकं यावेळी
कोणालाही माहिती नाही शपतविधी कधी होणार पण एक नक्की आहे, साधारणतः १५ ऑगस्टच्या अगोदर हा शपथविधी केलाच पाहिजे,करावाच लागेल कारण अमृतमहोत्सवी वर्षाचं हे झेंडा वंदन आहे. म्हणूनच १५ ऑगस्टच्या आधी शपतविधी निश्चित पणे होईल याबाबत मनात शंका नाही असं स्पष्ट मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे.