मुंबई – शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला खिंडार पडले आहे. या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्याकडून एकमेकांवर सतत टीका केली जात आहे. दरम्यान, एका वृत्त वहिनीसोबत बोलत असताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि बंडखोरांवर पुन्हा एकदा टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, “चुका सगळीकडेच होत असतात. चुका कुटुंबात, व्यापारात, धंद्यात होतात. राकारणातही होत असतील. जे प्रश्न विचारत आहेत ते नगरसेवक पदापासून मंत्रिपदापर्यंत, दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचा चार ते पाचवेळा अध्यक्ष होणं ही साधी गोष्ट नाही. यातूनच तुम्हाला बळ मिळाले आहे. यातूनच तुमची लालसा वाढली आहे. याच लालसेतून हा घाव घातलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी माकडांची माणसं केली. माणसांचे सरदार केले. याच सरदाराने शिवसेनेवर घाव घातले”, असे संजय राऊत म्हणाले.
‘ईडी म्हणजे केंद्र सरकारचं…’ काँग्रेस नेत्याची जीभ घसरली
“आपण ज्याच्यावर जास्त विश्वास ठेवतो तोच विश्वासघात करतो. विश्वासघात झाला म्हणजे विश्वास ठेवणे सोडून देता येत नाही. काम करताना सहकाऱ्यांवर, कुटुंबातील सदस्यांवर विश्वास ठेवावा लागतो. त्याशिवाय कुटुंब पुढे जात नाही. ज्याच्यावर आपण विश्वास टाकलेला आहे त्याच्या अंतरंगात काय सुरु आहे, हे आपल्याला समजत नाही. जोपर्यंत स्वार्थ आहे, तोपर्यंत विश्वासघात सुरुच राहील”, असेही राऊत म्हणाले.
काळी वाळू अन उसळणाऱ्या लाटा! जगातील सर्वात सुंदर पण प्राणघातक आहे ‘हा’ समुद्रकिनारा !