त्रिनिदाद – वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय टी-20 संघ त्रिनिदाद येथे दाखल झाला आहे. येत्या 29 जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 मालिका रंगणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराहसह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. मात्र, टी-20 हे सर्व खेळाडू मैदानात उतरणार आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखरेचा एकदिवसीय सामना उद्या खेळला जाणार आहे. त्यानंतर 29 जुलैपासून टी-20 मालिकेला सुरुवात होईल. दरम्यान, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमारसह अन्य खेळाडू त्रिनिदादच्या विमानतळावर दिसले.
The T20I squad members have arrived here in Trinidad 👋
The 5-match T20I series is all set to commence on July 29.#WIvIND #TeamIndia pic.twitter.com/pZLECGOtUu
— BCCI (@BCCI) July 26, 2022
टी-20 मालिकेचे वेळापत्रक (सामना,तारीख,ठिकाण)
पहिला सामना : 29 जुलै 2022 : पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा सामना : 1 ऑगस्ट 2022 : सेंट किट्स आणि नेव्हिस
तिसरा सामना : 2 ऑगस्ट 2022 : सेंट किट्स आणि नेव्हिस
चौथा सामना : 6 ऑगस्ट 2022 : फ्लोरिडा, अमेरिका
पाचवा सामना : 7 ऑगस्ट 2022 : फ्लोरिडा, अमेरिका