नवी दिल्ली – संसदेत महागाईवर चर्चा करणे “असंसदीय” आहे का, असा सवाल कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की मोदी सरकार दैनंदिन वापराच्या वस्तू महाग करीत आहे. पण त्यावर संसदेत चर्चा करण्यापासून ते पळ काढीत आहेत.
दैनंदिन वापराच्या अत्यावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू करणे हे सरकारचे “क्रूर” कृत्य आहे, अशी टीका कॉंग्रेस पक्षानेही या आधीच केली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधींनी हिंदीतील ट्विटमध्ये म्हटले आहे की, कमालीच्या महागाईच्या काळात घरगुती वापरातील अत्यावश्यक वस्तुंना करसवलत अपेक्षित असताना सरकारने त्यावर नव्याने जीएसटी लागू केला आहे.
अखिलेश यादव यांचा योगी सरकारवर निशाणा; म्हणाले, “बुलडोझर उलटेही चालते”
भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने पीठ, धान्य, गूळ आणि दही यावर “गृहस्थी सत्यनाश कर (जीएसटी) लादून सामान्यांवरील महागाईचा भार आणखी वाढवला आहे, असे त्या म्हणाल्या. तृणधान्ये, कडधान्ये, पीठ, दही, लस्सी, अशा पदार्थांवर पण जीएसटी लागू केल्याने सामान्य माणूस पूर्ण हैराण झाला आहे, असा एकूणच विरोधी पक्षांचा आरोप असून त्यावर संसदेत तातडीने चर्चा सुरू करा या मागणीसाठी विरोधकांनी संसदेचे कामकाज बंद पाडले आहे.
OBC Reservation : ओबीसी आरक्षणावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “हा मविआ सरकारच्या…”