मुंबई – राज्यात पुरामुळे 28 जिल्हे व 289 गावे प्रभावित झाली असून 83 तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. आत्तापर्यंत 14 हजार 480 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळे 109 नागरिकांनी आपला जीव गमावला असून 189 प्राणी दगावले आहेत. पावसामुळे आतापर्यंत 44 घरांचे पूर्णत: तर 2086 घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे. राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 18 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असून चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील 2 हजार 600 नागरीकांचे सुरक्षित स्थलांतर केले आहे. लष्कराचे व एनडीआरएफचे प्रत्येकी एक पथक, एसडीआरएफच्या दोन टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.
महागाईवरील चर्चा असंसदीय आहे काय; प्रियंका गांधी यांचा सवाल
नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्याची सद्याची पूर परिस्थिती आटोक्यात आहे. जिल्ह्यातील वैनगंगा नदी धोका पातळीच्यावर वाहत आहे तसेच वर्धा, प्राणहिता व इंद्रावती या नद्या इशारा पातळीच्यावर वाहत असून नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याचे माहिती मिळाली होती. आतापर्यंत 397 लोकांना 10 निवारा केंद्रात सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
ओबीसी आरक्षण श्रेयवादात बावनकुळेंची उडी; महाविकास आघाडीच्या नेत्यांना म्हणाले…
परशुराम घाटात एकेरी वाहतूक सुरू
कोकण विभागात रत्नागिरीत सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा 30 जुलै 2022 पर्यंत सकाळी 06 वा. पासून ते सायंकाळी 07. वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली असून, सायंकाळी 7 वा. ते सकाळी 6 वा. पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.