मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड पुकारले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून महाविकास आघाडी सररकारवर टांगती तालावर आहे. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 46 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यावरूनच रातोरात एवढे मंत्री निघून गेले. बंड केले. कळलं कसं नाही ? असा सवाल शरद पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केला आहे.
शिवाय सध्या शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिल्व्हर ओक वर बैठक सुरु असून या बैठकीत , मंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, बाळासाहेब पाटील, जयंत पाटील असे नेते उपस्थित आहेत. याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवार चर्चा करणार आहेत. दुपार पर्यंत सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा होऊ शकते.
आपला पक्ष भाजपबरोबर जाणार नाही
दरम्यान काल मंगळवारी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे या आधी दोन प्रयत्न झाले. पण ते फसले आता त्यांनी हा तिसरा प्रयत्न केला आहे. पण ही स्थिती सांभाळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सक्षम आहेत असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केले होते. हे सरकार पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करेल. जर सरकार पडले तर आपला पक्ष भाजपबरोबर जाणार नाही असे देखील पवार यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता महाविकास आघाडी सरकावर टांगती तलवार असल्याची जोरदार चर्चा आहे मग यात शरद पवार यांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.