मांजरी – “आपली भारतीय राज्यघटना हा मोठा कल्पवृक्ष आहे. आणि त्याची फळे प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोचविणे हे आपले काम आहे. हे काम म्हणजे बाबासाहेबांची उरलेले कामे आहेत. हा वृक्ष कायमचाच जिवंत राहणार आहे. त्यांचे मूळ कधीही बदलणार नाही. हा वृक्ष जपण्याचे काम प्रत्येक माणसाचे आहे. भारतीय राज्यघटनेने भारत व आपल्याला एकसंध ठेवलेले आहे. असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.
पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, शिवाजी मराठा सोसायटीचे विधी महाविद्यालय, तसेच शिवसाई मित्र मंडळ मांजरी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने “कायदेविषयक जनजागृती अभियान” मांजरी बुद्रुक येथील “जाई मंगल कार्यालय” येथे पार पडले . डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचे पूजन व दिप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख , शिवाजी मराठा सोसायटीचे विधी महाविद्यालय यांचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील ॲड. सुधाकर आव्हाड, ॲड. शरद मडके, ॲड. पांडुरंग थोरवे ॲड. सुरेखा भोसले , मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमित घुले, किसान संघाचे माऊली घुले तसेच हिटलर घुले , दिपक घुले, हनुमंत बारवकर ,नितीन शिंदे, फकीरा राठोड ॲड. लक्ष्मण घुले ॲड. संजय सावंत, मांजरी बुद्रुक चे सर्व प्रतिष्ठित गावकरी, विधी कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाबू वाघमारे, अमितआबा घुले, बंडू शेळके, तुषारतात्या घुले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
ज्येष्ठ विधितज्ञ ॲड. सुधाकर आव्हाड यांनी “शेती विषयक कायदे” ह्या विषयावर शेतकरी व कामगार वर्गाला मार्गदर्शन केले. शरद मडके यांनी ग्राहक संरक्षण कायदा 2019 या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच पांडुरंग थोरवे यांनी “दस्त नोंदणी- शासनाचे महत्त्वाचे परिपत्रके व अध्यादेश” या विषयावर मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन ॲड. सुरेखा भोसले यांनी केले. आभार अमितआबा घुले यांनी मानले.