पुणे : (प्रतिनिधी) पुणे महानगरपालिका निवडणुकीची शासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. आपले वाघोली गाव पालिकेत समविष्ट झाले आहे, आपल्या या भागातून आपलाच शिवसेनेचा माणूस निवडून गेला पाहिजे. यासाठी माऊली आबा कटके हेच एकमेव नाव घ्यावे वाटते. तेच निवडून येणारच आहेत. पण, मी तर म्हणतो आबांना महापौर पदाची संधी आहे, आता त्यासाठीच शिवसैनिकानी तयारी करावी, असे आवाहन पुणे शहर प्रमुख संजय मोरे केले.
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.
हवेली, शिरूर व खेड तालुक्यातील विविध ठिकाणी दि.२६ मे ते दि.२९ मे दरम्यान शिवसंपर्क अभियान आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार वाघोली येथे सदर अभियान घेण्यात आले.
त्यावेळी पुणे शहर प्रमूख मोरे बोलत होते. ते म्हणाले की, शिवसैनिकांच्या मनामध्ये असणाऱ्या शंका, समस्या, अडचणी सोडविण्यासह नागरिकांसाठी लोकहिताचे घेतलेले निर्णय कार्यकर्त्यांनी पोहोचवावेत यासाठी या अभियानातून प्रयत्न केले जात आहेत.
महापालिकेवर शिवसेनेची सत्ता येणार, असा आत्मविश्वास उद्धव ठाकरे साहेबांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर वाघोलीचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर येथे प्रभाग क्र. ४ मधून शिवसैनिक निवडून येण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आबांनी या भागात मोठे काम केले आहे, प्रथम नगरसेवक म्हणून ते निवडून येतीलच. पण, पालिकेचे महापौरपद खुल्या गटासाठी आहे. त्यात पहिलवान लोक महापौर होतात. मागचे महापौर हे पहिलवानच होते.
शिवसेनेची सत्ता तर येणारच आहे म्हणून यावेळी ती संधी माऊली आबा कटके यांना आहे. त्यांना महापौर करण्यासाठी सगळ्यांनी तयारी करावी, असे आवाहन करीत असल्याचे शहर प्रमुख मोरे यांनी सांगितले.
यावेळी ऍड. सतिश मुळीक यांनीही शिवसैनिकांशी संवाद साधला.
यावेळी मच्छिंद्र सातव, रामकृष्ण सातव, विशाल सातव, गौरव काळभोर, मिलिंद हरगुडे, सागर गोरे, दत्तात्रय बंडावले, राम गावडे, नवनाथ गोगावले, मारुती गाडे, पिंटू कटके, मोसम शेख, दादा पडवळ, तेजस राजवाडे, मंगेश सातव, दत्तात्रय जगताप, दर्शन सातव, संदीप तात्या शिंदे, अर्चनाताई भाडळे, छायाताई काकडे, आश्विनी जोशी (पांडे), सावंतताई यंच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगठन हिच शिवसेनेची ताकद
शिवसंपर्क अभियानचे निरीक्षक तथा खासदर संजय (बंडू) जाधव यांनीही शिवसैनिकाना मार्गदर्शन केले. ठाकरे सरकारने राबविलेल्या योजना सामान्य नागरिकापर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केले. संघटन महत्वाचे आहे, प्रत्येक शिवसैनिकाने शिवबंधनची जाणीव ठेऊन त्याप्रमाणे संगठनात्मक काम करावे. संगठन हिच शिवसेनेची ताकद आहे, हे लक्षात घ्यावे, यानुसार प्रतेकाने कार्यरत राहावे, असेही खासदार जाधव यांनी सांगितले.