मुंबई – उन्हाची काहिली वाढत असतानाच, महावितरणकडून वीजकपात सुरू आहे. या निर्धारित वीजकपातीने नागरिक त्रस्त असतानाच महावितरणने आता अतिरिक्त वीजकपातीचा शॉक दिला आहे. ऐन उन्हाळ्यात वीज नसल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून उकाड्यात रात्र जागून काढण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची कामं खोळंबत आहेत. याचाच अनुभव राज्याच्या मंत्रिमंडळालादेखील आला. मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानक लाईट गेली त्यामुळे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना अडचण निर्माण झाली. बैठकीचा खोळंबा झाला. यावरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट लिहिली आहे की,’खरंतर या सरकारचाच फ्यूज उडाला आहे. राज्यकारभाराची अवस्था वारंवार ट्रिप होणाऱ्या ट्रान्सफॉर्मरसारखी झाली आहे” असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
“मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान लाईट गेल्याने बैठकीत ई-उपस्थिती लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा संपर्क तुटल्याचा प्रकार समोर आला आहे. खरंतर या सरकारचाच फ्यूज उडाला आहे. राज्यकारभाराची अवस्था वारंवार ट्रिप होणाऱ्या ट्रान्सफॉर्मरसारखी झाली आहे.” असं म्हणत ठाकरे सरकारवर टोला लगावला आहे.
#सरकारचाच_फ्युज_उडालाय
मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान लाईट गेल्याने बैठकीत ई-उपस्थिती लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा संपर्क तुटल्याचा प्रकार समोर आला आहे. खरंतर या सरकारचाच फ्युज उडाला आहे. राज्यकारभाराची अवस्था वारंवार ट्रिप होणाऱ्या ट्रान्सफॉर्मरसारखी झाली आहे. त्यामुळे
1/2— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 12, 2022