नवी दिल्ली – शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर आरोप केल्यानंतर, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी त्यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. चढ्ढा यांनी म्हटले आहे की भगवंत मान यांचे चारीत्र्य 24 कॅरेट सोन्यासारखे आहेत. जनतेच्या नजरेतून साफ उतरलेल्या बादल यांनी आपल्या स्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा असा सल्लाही चढ्ढा यांनी त्यांना दिला आहे.
एएनआयशी बोलताना चढ्ढा म्हणाले, ज्यांचा काळ आता संपला आहे, त्यांनी पंजाबच्या राजकारणात काही गोळ्या झाडल्या आहेत. पंजाबला लुटल्यानंतर आणि उद्ध्वस्त केल्यानंतर, या गोळ्यांनी आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न चालवला आहे, मी त्याचा निषेध करतो. भगवंत मान यांचे चारित्र्य 24 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध आहे असे म्हणायला आवडेल.
अरविंद केजरीवाल-भगवंत मान ही जोडी सुपरहिट आणि लोकप्रिय आहे. भाजप, शिरोमणी अकालीदल आणि कॉंग्रेस या जोडीचा हेवा करत असल्याचे त्यांनी म्हटले. अकालीदलाच्या नेत्यांनी आता शिवराळ आणि खोटे आरोप करणे थांबवले पाहिजे, असे ते म्हणाले.
दरम्यान सुखबीरसिंग यांनी केजरीवालांवरही आरोप केले आहेत. केजरीवाल यांनी पंजाबमधील प्रशासनावर नियंत्रण ठेवल्याचा आरोप सुखबीर सिंग यांनी केला आणि ते म्हणाले की केजरीवाल हिमाचल प्रदेशातील निवडणूक प्रचारासाठी पंजाब सरकारच्या हेलिकॉप्टरसह अन्य संसाधने वापरत आहेत.