पुणे- सिंहगडावर शनिवारी दक्षिण मुख्यालय आणि इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतीने नरवीर तानाजी रनचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सिंहगडावरील रस्ता सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष आणि सिंहगड जिंकल्याच्या 351 व्या वर्षानिमित्त “नरवीर तानाजी रन’चे आयोजन करण्यात येणार आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्यापासून ही रन सुरू होणार असून, सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळापर्यंत पोहोचणार आहे. या पार्श्वभूमीवर सुट्टीचे निमित्त साधून सिंहगडावर ये-जा करणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रनदरम्यान अडथळा टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.