मुंबई – रशिया-युक्रेन युद्धाची गडद छाया संपूर्ण जगावर पसरली असताना याचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या किचनपर्यंत येऊन पोहचला आहे. कारण की, खाद्य तेलांच्या किंमतीत मोठी दार वाढ झाली आहे. भारतात जवळपास 70 टक्के हुन अधिक खाद्य तेल हे युक्रेनमधून आयात केले जाते. पण अपुऱ्या पुरवठ्याने आता शेंगदाणा, करडी तेल यांचे भाग गगनाला भिडले आहे. त्यामुळे सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
दरम्यान, येणाऱ्या काळात या दोन देशांच्या युद्धाचा मोठा फटका सर्वसामान्यांच्या जीवनावर बसणार हे नक्कीच. आपण हलक्या प्रतीचं तेल म्हणून पाम, सरकी, सोयाबीन या तेलाकडे बघतो तर उच्च प्रतीचे तेल म्हणून शेंगदाणा, करडी तेल यांच्याकडे पाहतो. आणि म्हणूनच उच्च प्रतीच्या तेलाचे भाव नेहमी प्रमाणे जास्तच राहिलेले आहेत.
तर सध्याची परिस्थिती आणि अपुऱ्या टंचाई मुळे पामतेलाची किंमत ही शेंगदाणा तेला इतकची झाली. सूत्रांच्या माहितीनुसार येणाऱ्या काही काळात तेलाचे भाव आणखी वाढतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 24 फेब्रुवारीला युद्ध सुरु झालं. परिणामी आणि युक्रेन आणि राशियातून आयात होणारं खाद्यतेल बंद झालं. त्याचवेळी शेंगदाणा तेलाचीही निर्यात बंद झाली.