नवी दिल्ली – देशासह उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या काळात मध्यमवर्गीय आणखीच गरीब झाला असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज केला.
उत्तर प्रदेशमध्ये प्रचार सभेदरम्यान त्या बोलत होत्या. प्रियंका गांधी म्हणाल्या, एकही शिक्षण संस्था भाजपच्या काळात सुरू करण्यात आली नाही, तर फक्त जातीपातीच्या नावावर लोकांमध्ये फूट पडण्याचे काम भाजपने केले आहे.
मतदारांनी सरकारला विकास आराखडा संदर्भात नक्कीच प्रश्न विचारले पाहिजेत.
कॉंग्रेसच्या काळात सुरू झालेल्या आयआयटीसारख्या शिक्षण संस्था आजही देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देत आहेत, तर मोदींच्या काळात गरीब रेषा एवढी मोठी झाली की हळूहळू मध्यमवर्गीय नाहीसा होत आहे, अशी टीकादेखील त्यांनी भाजप सरकारवर केली.