पुणे (प्रतिनिधि) : राज्य सरकार आणि परिवहन कार्यालयाने बाईक टॅक्सी बेकायदा आहे हे मान्य केलेले असून सुद्धा प्रत्यक्षात प्रशासनाने अद्यापही ओला, उबेर, रॅपीडो सारख्या कॅब ऍग्रीगेटर कंपन्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.
त्यासंदर्भात डॉ. केशव नाना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली, ‘बघतोय रिक्षावाला’ने सरकारला अंतिम इशारा दिला होता की, 10 फेब्रुवारीपर्यंत बेकायदा बाईक टॅक्सी बंद झाली नाही, तर परिवहन कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल. त्याप्रमाणे बघतोय रिक्षा संघटनेच्यावतीने परीवहन कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.