नवी दिल्ली – लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारण्याच्या प्रकाराबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी आजही विरोधकांनी लोकसभेत गदारोळ केला. त्यामुळे आज दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.
तत्पूर्वी विरोधकांनी सरोगसी नियामक दुरूस्ती विधेयकाला अनुमती दिली. हे विधेयक आधीच राज्यसभेत मंजूर झाले आहे. आज सकाळच्या सत्रात लोकसभेत तीन विधेयके सादर करण्यात आली तसेच अनेक मंत्र्यांचे प्रस्तावही दाखल करून घेण्यात आले.
सरोगसी दुरूस्ती विधेयक मंजूर केल्यानंतर लगेचच विरोधकांनी अजय मिश्रांच्या राजीनाम्याच्या मागणीचा आग्रह धरीत घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभापतींनी संपूर्ण दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.