चिंबळी – विश्वचैतन्य सद्गुरू नारायण महाराज श्रीक्षेत्र नारायणपूर यांचे कृपा आशिर्वादाने गेल्या 20 वर्षांपासून चालत आलेल्या दत्त जयंती निमित्त संगमनेर (सिन्नर अकोले) ते श्रीक्षेत्र नारायणपूर भव्य पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत कुरुळी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी सरपंच कविता गायकवाड, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष एम. के. सोनवणे, माजी सरपंच देवराम सोनवणे, शरद मुऱ्हे, बाळासाहेब सोनवणे, सदस्य अमोल सोनवणे, संभाजी सोनवणे, गुलाब कांबळे, अमित मुऱ्हे, विशाल सोनवणे, युवा उद्योजक अजित गायकवाड, माजी सरपंच आशा सोनवणे, प्रमिला मुऱ्हे, एकनाथ सोनवणे, शांताराम घाडगे, किसन डोंगरे, सुदाम मुऱ्हे, युवा उद्योजक अमोल सोनवणे आदि मान्यवरांसह सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. चिंबळी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा प्रगतिशील शेतकरी शंकर पांडुरंग जैद व हॉटेल संकेतचे मालक अरुण जैद यांच्या वतीने चहा, नाष्टा, पाणी वाटप करण्यात आले.