चिंबळी – कुरुळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता अजित गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी, या हेतूने सरपंच शिल्पा सोनवणे यांनी एक वर्षांच्या कालावधीत ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेसाठी सरपंचपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा आळंदी येथील मंडल अधिकारी स्मिता जोशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवडणुकीत सर्वानुमते कविता अजित गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल यांनी सांगितले.
यावेळी मावळत्या सरपंच शिल्पा सोनवणे, उपसरपंच विशाल सोनवणे, सदस्य शरद मुऱ्हे, शोभा गायकवाड, सागर मुऱ्हे, अमोल सोनवणे, नितीन गायकवाड, नेहा बागडे, प्रतिभा बागडे, रमेश पवार, अनिता बधाले, विजया गोसावी, वैशाली मुऱ्हे, दीपक डोंगरे, शैला आमले, स्वप्निल कांबळे उपस्थित होते.
सरपंच कविता गायकवाड यांचा ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे सहायक रामदास वळसे-पाटील, माजी सरपंच देवराम सोनवणे, पोलीस पाटील प्रतिभा कांबळे, मल्हारी बागडे, शांताराम घाडगे, सखाराम बागडे, माजी सरपंच बाळासाहेब सोनवणे, शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, अमित मुऱ्हे, विशाल सोनवणे, ज्ञानेश्वर गोसावी, अनिल बागडे, माजी सरपंच आशा सोनवणे, प्रमिला मुऱ्हे, अजित गायकवाड, मदन गायकवाड, किशोर बागडे, रामेश्वर सोनवणे, शिवाजी सोनवणे, बाबासाहेब गायकवाड आदि मान्यवरांसह सर्व आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सरपंच कविता गायकवाड यांची मिरवणूक काढून सर्व ग्रामस्थांना स्नेह भोजन करण्यात आले.